सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो- भाग शेवटचा.... पुनितदादा बालन

प्रति, 
पुनित दादा बालन, 
ऊत्सवप्रमुख, 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी 
गणेशोत्सव ट्रस्ट, पुणे, 


स. न. वि. वि. 

पत्र लिहण्यास कारण की, 

आपल्या मराठी भाषेमध्ये मध्ये एक म्हण आहे. 
"संकटसमयी जो मदत करतो तोच खरा मित्र"....."दादा तुच तो पुणेकरांचा मित्र"... जो संकटसमयी पुणेकरांचा पाठिशी एका थोरल्या भावाप्रमाणे ऊभा राहिला.....


प्रत्येक सुपरहिरो ला एका सुपर शक्ती ची गरज असते. करोना महामारीच्या काळात जनसेवक रुपी असणाऱ्या ब-याच  सुपरहिरोंना एका सुपर शक्ती ची गरज होती. आणि ती सुपर शक्ती म्हणजे करोना चा काळात पुण्यासोबत महाराष्ट्रातील नागरिकांना भरघोस सढळ हाताने मदत करणारे नाव म्हणजे पुनित दादा बालन.


लाॅकडाऊन चालु झाल्यापासून दररोज हजारो नागरिकांना, पोलिस बांधवांना आणि पोलीस मित्रांना स्वखर्चाने टि शर्ट , फेस शिल्ड ,पाणी बाॅटल्स, सॅनिटाइजर वाटप, दररोज मोठ्या प्रमाणात गरजुंना अन्नदान , पडद्यामागच्या 450  कलावंतांना
7. 50 लाख रुपये ची मदत , पुणे शहर आणि जिल्ह्यातील रोजावर काम करणाऱ्या गरजु  लोकांना 25,000 शिधा किटचे वाटप, स्पेशल रेल्वे ने गावाला जाणाऱ्या कामगारांना मोफत पाणी आणि दुध वाटप पुनित दादा बालन  ग्रुप आणि इंद्राणी बालन  फाऊंडेशन यांच्यातर्फे करण्यात आले. लाॅकडाऊन च्या पहिल्या टप्प्यात एकाच वेळी शहरातील 2500 वृत्तपत्र विक्रेत्यांना शिधावाटप, विनामूल्य करोना पुर्व तपासणी शिबिरे, सर्व पत्रकार, न्युज रिपोर्टर, छायाचित्रकार यांना हजारो संख्येने मास्क आणि फेसशिल्ड वाटप करण्यात आले. पुण्यातील पत्रकार, फोटोग्राफर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांची मोफत स्वतः टेस्ट, अत्यावश्यक सेवेत काम करीत असलेल्या 200 रिक्षा चालकांचे मोफत मेडीकल विमा एवढेच नव्हे तर मदतीला धावून येणा-या करोना योध्दांसाठी रोख पारितोषिके आणि आॅनलाईन गणेशोत्सवाची सुरवात त्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळातर्फे यशस्वी रीत्या आपल्या संकल्पनेनी यशस्वी राबवून दाखवली. प्रत्येक स्तरामधील गरजु कुटुंबांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता माणुसकी चे दर्शन देणारा आणि सढळ हाताने मदत करणारा पुणेकरांच्या संकटसमयी धावुन जाणारा संकटमोचन थोरला भाऊ म्हणायला आम्हा पुणेकरांना जरुर आवडेल. 

 आपल्या कार्याचा लेखाजोखा ईतका मोठा आहे. की केवळ एका लेखात  केलेले कार्य लिहणे शक्य नाही तर कमीत कमी 100 पानांचे एक पुस्तक लिहायला लागेल. केवळ करोना काळात नव्हे तर ईतर वेळी आपण इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे  नेहमीच गरजूंची मदत करत आलेले आहात. केवळ पुणे आणि महाराष्ट्रापुरते मर्यादित न रहाता काश्मीर च्या खोरे पर्यंत आपण लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात दिलेला आहे. एक रुपया कमवल्यास 30 पैसे समाज कार्यासाठी खर्च करण्याची आई इंद्राणी बालन यांनी दिलेली शिकवण आपण आजसुद्धा अभिमानाने जपता. 

 यशस्वी उद्योजक असले तरी, पाय जमिनीवर  असलेला माणूस काय असतो याचे उदाहरण म्हणजे दादा स्वतः आपण. पुणेकरांना एक हक्काचा थोरला भाऊ आणि ज्येष्ठांना एक मानसपुत्र आपल्या रुपाने मिळाला आहे. आपल्या या अगणित कार्यामुळे पुनित दादा बालन हे नाव पुण्यातील घराघरात पोहोचले आहे.

किनाऱ्यावर बसुन मासे पकडण्यापेक्षा खोल समुद्रात जाऊन मासे पकडण्याचे जाळे जो फेकतो तो खरा हिरो असतो. 
याचप्रकारे महामारी च्या काळात स्वतः उद्योजक असल्याचा टॅग बाजुला सारुन फिल्डवर उतरुन , स्वतः जातीने लक्ष घालून काम करणारे आपले कार्य कौतुकास्पद आहे . 

अशा या आमच्या हक्काच्या थोरल्या भावाला, सर्व पुणेकर बांधवांकडुन आपणांस आणि आपल्या अगणितिक मदतीला  सलाम..... सलाम..... सलाम.....


कळावे, 

आपला लहान भाऊ
एक तरुण पुणेकर



संकल्पना 
आकाश इंगवले

लेखक
गिरीश भोसले


टिप्पणी
पुनित दादा बालन आणि माझा कोणत्याही प्रकारचा परीचय नसुन केवळ फक्त त्यांनी या काळात न भुतो न भविष्यातो केलेल्या कार्याचे वर्णन करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सदर लेख एक तरुण पुणेकराच्या नजरेतुन लिहलेला आहे. 


रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

ओ.....डॅम-ईट....ईनस्पेक्टर महेश..... श्रीरंगपुर.... लक्ष्या

महेश..... महेश...... महेश...... 

ईनस्पेक्टर महेश.....80,90दी मध्ये जन्मलेल्या सर्वांचा आवडता डॅशिंग मराठी हिरो म्हणजे महेश कोठारे. आम्हां 90दी मध्ये जन्म घेतलेल्यांसाठी महेश कोठारे हे आमच्या साठी सुपरहिरोच होते. लहानपणापासूनच शनिवारी आणि रविवारी 4 वाजता त्यांचे चित्रपट कधी लागणार याची  आठवडा भर वाट पहायचो आम्ही.

तात्या विंचू,टकलु हैवान, कवट्या महाकाळ, कुबड्या खविस, बाबा लगिन वाला बाब्या, बाबा चमत्कार, मृत्यूंजय मंत्र, आणि सर्वात महत्त्वाचे नवकोटनारायण यदुनाथ जवळकर या पात्रांना जन्माला घालणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले श्रीरंगपुर चे महेश कोठारे. 
बालकलाकार असलेले महेश कोठारे यांनी 1964 मध्ये छोटा जवान  चित्रपटातुन पहिल्यांदा आपल्या अभिनयाची जादु दाखविली. आणि त्यानंतर आज 55 वर्षा नंतर सुध्दा हा महाराष्ट्राचा आवडता कलाकार लोकांना आपल्या घरातील वाटतो. 

अभिनेता,लेखक, दिग्दर्शक, निर्माता असलेल्या महेश कोठारे यांनी आपल्या नवनवीन कल्पनाशक्तीद्वारे मराठी माणसाला चित्रपटगृहात वारंवार येण्यास आवडीने भाग पाडले.  झपाटलेला मधला तात्या विंचू असो किंवा धुमधडाका मधले यदुनाथ जवळकर असो, महेश जींनी जन्माला घातलेली पात्र ही चित्रपट सृष्टीत अजरामर करुन टाकली. ईनस्पेक्टर महेश आणि धांदरट लक्ष्या म्हणजे आपले लक्ष्मीकांत बेर्डे ऊर्फ मामा यांची जोडी तर तुफान लोकप्रिय झाली.

धुमधडाका, झपाटलेला, थरथराट, धडाकेबाज, पछाडलेला, झपाटलेला, माझा छकुला, जबरदस्त, खबरदार, दे दणा दण, धांगडधिंगा यांनी थिएटर च्या बाहेर आणि आत अक्षरक्षः धुमाकूळ घातला.आणि सध्या च्या काळात टिव्ही वर जय मल्हार आणि दख्खन चा राजा ज्योतिबा या मालिकांची निर्मिती केली.पहिला वहिला 3डी मराठी चित्रपट काढण्याचे शिवधनुष्य उचलणारे नाव म्हणजे महेश कोठारे.


अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस. अशा या कलागुणाने झपाटलेल्या धडाकेबाज हिरो ला वाढदिवसाच्या जबरदस्त, दे दणा दण शुभेच्छा.

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो, भाग 7, निरंजन भाऊ आणि बाळासाहेब उर्फ आण्णा दाभेकर.

पुण्याचे सुपरहिरो, भाग 7, निरंजन भाऊ आणि बाळासाहेब उर्फ आण्णा दाभेकर. 


भावाभावांची सुपरहिट जोडी असते..... मित्रांची सुध्दा असते...पण वडिल आणि मुलाची जनसेवक रुपी सुपरहिरो ची जोडी पुणे शहरातील मध्यवर्ती भागात नागरीकांना पहायला मिळाली..... बाळासाहेब ऊर्फ अण्णा दाभेकर  आणि त्यांचे चिरंजीव निरंजन दाभेकर, राहणार. नारायण पेठ

जिंदगी जीने के दो तरीके होते है. 
एक-जो हो रहा है होने दो, बरदाश्त करते जाओ, 
या फिर जिम्मेदारी उठाओ, ऊसे बदलने की, 

या महामारी च्या काळात पुणे शहरात  नारायण, सदाशिव पेठ आणि सभोवतालच्या भागात गरजु लोकांसमोर पोट भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी त्यांच्या साठी स्वखर्चाने १०१ दिवस अन्नदान करण्याचे शिवधनुष्य उचलले ते या सुपरहिरो पिता पुत्राच्या जोडीने. एकही दिवस खडा न करता सलग 101 दिवस शेकडो लोकांना अन्नदान करण्याचे एक सुंदर समाज उपयोगी काम निरंजन दाभेकर यांनी त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शनाखाली केले. शेकडो नागरीक ज्या मध्ये बॅकस्टेज काम करणारे कलाकार, गरजुंना दररोज औषधे, अन्नधान्य, फळे, कपडे, चप्पल, पाणी, सॅनिटाइजर, वाटप केले. तसेच आरोग्य आणि रक्त दान शिबिरांचे आयोजन केले. आणि या मध्ये त्यांना मदत झाली शेकडो मित्र परिवार आणि स्वयंसेवी नागरिकांची. 

करोना कोणाच्याही घरी येऊ शकतो  त्यामुळे कोणत्याही करोना बाधीत कुटुंबातील लोकांशी भेदभाव करू नका..वेळ कोणा साठी थांबत नाही  कधीही येते काळजी घ्या ..आम्ही तुमच्या  सोबत  आहे.
हा संदेश निरंतरपणे  नागरिकांना देउन लोकांना विश्वासात घेऊन काम करणारे संघर्ष योध्दा पिता पुत्राची जोडी म्हणजे निरंजनभाऊ आणि  बाळासाहेब ऊर्फ अण्णा दाभेकर .

अगर आपके ईरादे मजबूत है तो, बडे से बडा तुफान भी आपका कुछ नहीं बिगाड सकता ...... या वाक्याची प्रचितीच जणु या करोना वाॅरीयर पिता पुत्रांनी करून दिली. या महामारी च्या काळात सर्व सामान्य नागरिकांना मदतीचा मजबुत हात देणारे पिता पुत्रांच्या कार्याला सलाम.. सलाम.... सलाम

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो भाग - ६, निलेश दादा पिंगळे आणि मित्र परिवार

मैं ऊडना चाहता हुं, ...... 
दौडना चाहता हुं, ....... 
गिरना भी चाहता हुं...... 
बस रुकना नहीं चाहता..... 

असेच काही व्यक्ती असतात. कितीही मोठं संकट येऊ द्या. त्या संकटाचा कर्दनकाळ बनुन आपले काम अविरतपणे चालू ठेवतात. अशा योध्द्यांनाच सुपरहिरो म्हणतात. 
अशाच एका पुणे शहराचा एक भाग असलेला पिंपरी चिंचवड मधील एका सुपरहिरो बद्दल आज आपण माहिती घेऊया. 
नाव - निलेश जनार्दन पिंगळे
सदस्य थेरगाव सोशल फाऊंडेशन

निलेश पिंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाॅकडाऊन च्या सुरुवातीच्या काळात शेकडो नागरीक आणि विद्यार्थी ज्यांना मेस आणि हाॅटेल बंद असल्याने जेवणाचा प्रश्न उभा राहिला होता त्यांच्या साठी सुरवातीला स्वखर्चाने दररोज 40 डब्यांची व्यवस्था केली. या सेवेत त्यांना त्यांचे मित्र अनिकेत प्रभु, राहुल सरोदे, अमित घोडेकर याची महत्वपूर्ण साथ लाभली. आणि पाहता पाहता अन्नदानाचे कार्य 40 डब्यांवरुन हजारोंच्या घरात पोहचले. या कार्यात त्यांना त्यांच्या बरोबर त्यांचे जवळपास 200 सहकारी योध्द्यांची फौज मदतीला होती. या अन्नदानाचा मदतीसाठी सोशल मिडियाचा योग्य वापर या सुपरहिरोंनी केला. नागरीक आणि गृहनिर्माण संस्था नी सुध्दा या कामात त्यांना मदत केली. जेवणासाठी लागणारी भाजीपाला काढण्यापासून ते भांडी धुणे ही कामे त्यांनी स्वखुशीने न लाजता केली. 
जवळपास ज्या लोकांचे हातावर पोट आहे अशा 1000 पेक्षा जास्त कुटुंबांना त्यांनी अन्नधान्य किट्स चे वाटप केले. मिनी माथेरान समजले जाणारे खालापूर तालुक्यातील ऊंबरवीरा गावाला जेव्हा निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला त्या वेळी तेथील नागरीकांना अन्नधान्य, चट ई, ब्लॅंकेट, चादर आणि गरजेचे साहित्याचे स्वखर्चाने वाटप करुन एक साद माणुसकीची हा यशस्वी उपक्रम राबविला. केवळ 11 दिवसात प्लाझा डोनेशन चे शतक पुर्ण करणारे थेरगाव सोशल फाऊंडेशन हे पुणे जिल्ह्यातील पहिलीच सेवा भावी फाऊंडेशन असेल. फाऊंडेशन कडुन आतापर्यंत 350 पेक्षा जास्त जणांचे प्लाझ्मा दान पुर्ण करण्यात आले आहे. तसेच रक्तदानाचे शिबिर आयोजित करण्यात आले. 
आणि या संपुर्ण सेवाभावी कार्याचे शिल्पकार म्हणजे निलेशदादा पिंगळे आणि त्यांची वाॅरीयर टिम.

किनारे बैठकर पानी में काँटा डाले मछली के फंसने का इंतजार करने वाले को बहादुर नहीं कहते..
सच्चा बहादुर वो होता है, 
 जो तूफानी समुन्दर के बीच में जाकर मछली पकड़ने का जाल फेंकता है.

करोना ला न घाबरता , संकटाला सामोरे जाऊन स्वत समाजसेवेच्या मैदानावर उतरून मदतीचा पाऊस पाडणारा निलेश दादा पिंगळे आणि त्यांचे सहकारी वाॅरीयर टिम आपल्या कार्याला पुणेकरांचा मानाचा मुजरा. 

विशेष सहकार्य - ऋषिकेश ऊर्फ आबा बालगुडे

लेखक
अॅड गिरीश भोसले
निलेश दादा पिंगळे आणि थेरगाव सोशल फाऊंडेशन चा सदस्यांचा आणि माझा कुठल्याही प्रकारे हितसंबंध अथवा परिचय नसुन सदर लेख हा निलेश दादा पिंगळे आणि त्यांचे शेकडो सहकारी यांच्या अभुतपूर्व कार्या प्रित्यर्थ लिहलेला आहे.

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

आणि मिसबाह ने हवेत मारलेला तो चेंडू श्रीसंत च्या हातात विसवला.... मग फक्त होता केवळ जल्लोष..... 🇮🇳

विजयाची ती 13 वर्षे...... 

भारतीय संघ 2007 च्या विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीतुन बाहेर पडला .... खुप टिका झाली.... टि 20 चषकासाठी महेंद्र सिंग धोनी ला कर्णधार म्हणून नेमण्यात आले. सचिन द्रविड गांगुली या अनुभवी खेळाडूंनी माघार घेतली होती आणि धोनी च्या नेतृत्वाखाली नवखा संघ टि 20 चा पहिला विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेला पाठविण्यात आला. 

पहिलाच सामना पावसामुळे रद्द. दुसऱ्या सामना पाकिस्तान विरुद्ध. ते सामना अनिर्णित राहिल्यावर बाल आऊट ने सामन्याचा निर्णय घेण्यात आला. आणि सामना भारतीय संघ जिंकला. 

हेच दोन्ही संघ अंतिम सामन्यात समोरासमोर आले. दिवस होता 24 सप्टेंबर 2007 स्थळ होतं जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका....भारतामध्ये साधारणपणे सायंकाळचे  6-7 वाजले होते. 

सामन्याला सुरवात झाली. ठराविक अंतराने भारतीय संघाच्या विकेट पडत होत्या पण गौतम गंभीरने एका बाजूने किल्ला लढवुन ठेवला होता.  गंभीर च्या 75 आणि रोहित शर्मा च्या 30 धावांमुळे भारतीय संघाने पाकिस्तान संघासमोर 158 धावांचे आव्हान ठेवले. 
सहज वाटणारे आव्हानाला सामोरे जाताना सुध्दा पाकिस्तान चा संघाने विकेट फेकल्या पण मिसबाह ऊल हक हा खेळाडू मैदानावर असल्याने भारतीय संघासाठी धोकादायक ईशारा होता. आणि झाले ही तसेच, शेवटच्या षटका पर्यंत सामना रंगला. शेवटचे षटक धोनी ने नवख्या जोगिंदर शर्मा ला दिले. एक वाईड आणि एक षटकार गेल्यामुळे सामना भारतीय संघाच्या हातून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पण शेवटचा षटकाच्या तिस-या चेंडुवर मिसबाह ऊल हक चेंडू मागे टोलवायला गेला.... टायमिंग चुकले..... चेंडू हवेत ऊडाला.... एका क्षणासाठी भारतीयांच्या हृदय धडधडायचं थांबलं.... आणि श्रीसंत ने अलगद कॅच पकडला....... 

आणि त्यानंतर होता केवळ जल्लोष...... जल्लोष...... आणि फक्त जल्लोष..... टि 20 चा पहिला वहिला विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. आणि भारतात म्हणताल तर दोन महिने अगोदर च दिवाळी साजरी झाली होती. 

काही दिवसांपूर्वी ज्या संघाला पहिल्या फेरीतुन बाहेर पडायला लागले होते त्याच आपल्या भारतीय संघाने ईतिहास घडविला होता. अनंत चतुर्दशी चा आदला दिवस होता.... गणपती बाप्पा ने जणु भारतीयां साठी जाता जाता गिफ्ट च दिले होते. दोन दिवसानंतर भारतीय संघ ज्या वेळी मुंबईत परतला त्या वेळी ओपन बसमधून काढलेली मिरवणूक आणि भारतीय संघाचा वानखेडे मैदानावर झालेला सत्कार हा डोळे दिपवणारा होता........

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो - भाग 5, अक्षयदादा कोठावळे

पुण्याचे सुपरहिरो - भाग 4


सुपरहिरो....... कोण असतो हा सुपर हिरो.....? 100 जणांना एका फाईटित लोळावणारा असतो का सुपरहिरो.... हिरोईन ला वाचविणारा असतो का सुपरहिरो?..... हे सगळं चित्रपटात चांगलं वाटतं.... प्रत्यक्षात नाही.... पण या महामारी च्या काळात काही सर्व सामान्य घरातील युवक , युवती , जनसेवक लोकांच्या मदतीला धावून आले.....हेच ते खरे सुपरहिरो..... असाच एक सुपरहिरो जो अगदी सर्वसामान्य , तुमच्या आमच्यातला... पण त्याचे कार्य आभाळापेक्षा मोठं असु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अक्षयदादा कोठावळे...... 


कोण आहे अक्षय कोठावळे.... कोण नगरसेवक आहे?.... उद्योजक आहे?....नेता आहे..... अजिबात नाही.... अक्षय कोठावळे ही व्यक्ती एक सर्वसाधारण रिक्षाचालक, पण त्यांना आलेल्या अडचणी आणि या अडचणींवर मात करुन आपले कार्य न थांबता चालू ठेवणारे नाव म्हणजे अक्षयदादा कोठावळे.....

स्वताच लग्न मे महिन्यात ठरले होते. कष्ट करुन लग्नासाठी 2 लाख जमवले होते. लाॅकडाऊन मध्ये गरिब आणि गरजु लोकांचे हाल पहावले नाही आणि कष्ट करून जमवलेली 2 लाख रुपयांची रक्कम त्यांनी समाजकार्यासाठी वापरायची ठरवली. दररोज साधारणपणे 400 लोकांना स्वखर्चाने अन्नदान करण्याचा उपक्रम या सुपरहिरोने सुरू केला. यामध्ये त्यांच्या होणाऱ्या पत्नी ने आणि कुुटुंबीयांनी सुध्दा मोलाची साथ दिली. ही मदत करत असताना अक्षय यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. पण दु:ख बाजुला ठेवून हा योध्दा कार्यरत राहिला. अक्षय यांच्या वडील आजारी असताना त्यांचा वडिलांना ये-जा करण्यासाठी अँब्युलन्स मिळाली नव्हती. असं इतरांसोबत होऊ नये म्हणून अक्षय यांनी रिक्षाद्वारे मोफत अँब्युलन्स सेवा सुरू केली आहे. जमिनी वर पाय असलेला सर्व सामान्य घरातील सुपरहिरो चे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अक्षय कोठावळे. 

प्रचंड ईच्छाशक्ती च्या जोरावर माणुस काहीही करु शकतो याचा प्रत्यय म्हणजे अक्षय दादा कोठावळे. 
आपल्या या अभुतपूर्व कार्याला समस्त पुणेकरांच्या वतीने सलाम..... सलाम..... सलाम...... 


तु दिलेर भी है...... ❤️
और दर्यादिल भी...... 🌊❤️
आपका नाम सबसे ऊपर होगा...... 


लेखक
अॅड गिरीश भोसले

टिप्पणी - योगायोगने अक्षय दादा कोठावळे आणि मी एकाच शाळेचे विद्यार्थी आहोत. ( कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाला, महाराष्ट्र मंडळ) अक्षय दादा हे मला शाळेत वरीष्ठ असुन माझा आणि त्यांचा कुठलाही परीचय नाही. 
सदर लेख हा त्यांचा समाज उपयोगी कार्याच्या प्रित्यर्थ लिहलेला आहे.

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो - भाग 4, वैभवदादा वाघ

वैभवदादा वाघ - जात धर्म कर्म  भारतीय या संकल्पनेचे शिल्पकार

काही जण आपल्या कार्याने सुपरहिरो होतात किंवा आपल्या कामाच्या शैलीमुळे सुपरहिरो असतात. पण काही व्यक्ती जन्मतःच सुपरहिरो असतात..... असाच एक आपल्या पुणे शहरातील जनसेवेचा वारसा जन्मतः वारसा घेऊन जन्मलेला सुपरहिरो म्हणजे वैभवदादा वाघ...... 

फक्त करोना च्या काळात नव्हे तर 12 महिने 24 तास अनोळखी व्यक्ती ने जरी मदतीसाठी हाक मारली तरी पहिली हजर असणारी व्यक्ती म्हणजे वैभवदादा. 

आपल्या वंदेमातरम संघटना, आणि युवा वाद्य पथक आणि आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने करोना प्रादुर्भावात केलेले काम म्हणजे कौतुक करण्याजोगे. 

4 लाख पेक्षा अधिक फुडपॅकेट्स चे वाटप, तसेच 15 हजार पेक्षा जास्त गरजुं कुटुंबांना अन्नधान्य किट्स वाटप, 20 हजार पेक्षा जास्त  अरसेनिक गोळ्यांचे वाटप, आणि कोकणात मोठ्या प्रमाणात सौर दिव्यांचे वाटप, या सुपरहिरो आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे करण्यात आले. रायगड जिल्ह्यात ज्या वेळी वादळाने थैमान घातले होते त्यानंतर खुद्द स्वताहा भर पावसाळ्यात कोकणातील व्यक्तींना मदत करणारा हा संघर्ष योध्दा. वयोवृद्ध अथवा गरजु व्यक्तीना औषधे पोहचविणारा ,  गरजु उमेदवारांना नोकरी मिळवुन देण्यासाठी धडपड करणारा , कोणतेही काम करायला न लाजणारा हा तरुण म्हणजे युवकांसाठी एक आयडाॅल च म्हणावा लागेल. पुणे शहरात प्लाझ्मा डोनेशन चे शतक करणारी वंदेमातरम संघटना ही पहिलीच असेल. या काळात सचिन आण्णा जामगे, अॅड अनिष व अॅड मनिष पाडेकर सर व सेवा मित्र मंडळ आणि वंदे मातरम संघटनेच्या आणि शेकडो मित्रांच्या मदतीने अन्नदानाचा, समाजसेवेचा आणि प्लाझ्मा डोनेशन चा रेकार्ड करणारा पुण्यातील पहिला मित्र परीवार असेल. 

काही लोकांचे कार्य सांगायला गेले तर शब्द संपतील पण त्यांच्या कार्याचा अहवाल संपणार नाही...... याचं उत्तम उदाहरण म्हणजे वैभवदादा वाघ..... 



 फक्त करोना च्या काळातील नव्हे तर त्यांचे न संपणारे उपक्रम पाहण्यासाठी भारत देशावर प्रेम करणा-या प्रत्येक नागरिकाने त्यांचे फेसबुक अकाऊंट ला एकदा भेट द्या. 
एक सामान्य घरातील एक देशसेवेला🇮🇳 आणि समाजसेवेला आपले आयुष्य वाहुन घेतलेला तरुण👨🏻 काय असतो याची प्रचिती आपल्याला येईल.


काही दिवसांपूर्वी त्यांची फेसबुक वरची एक पोस्ट पाहिल्यावर लक्षात आले की वैभवदादा हे करोना पाॅझिटिव आहेत. पण ज्याच्या नावातच वाघ 🐯आहे त्याच्या समोर करोना म्हणजे किस झाड की पत्ती.☘️
दादा लवकर करोना चारिमुंढ्या चित करून आपल्या नवीन संकल्पनेची आणि नवीन उपक्रमांची आम्ही आवर्जून वाट पाहतोय. 

"जात, धर्म आणि कर्म केवळ भारतीय 🇮🇳" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तो प्रत्यक्ष इतर राबवणारे वैभवदादा वाघ आपणास समस्त पुणेकर बांधवांकडुन आपल्या अगणित समाज ऊपयोगी कार्याला सलाम...... सलाम...... सलाम...... 🙏🏻

लेखक🖋️
आपल्या नवनवीन संकल्पनेचा आणि जनसेवेचा चाहता 
अॅड. गिरीश भोसले. 

टिपण्णी - वैभवदादा यांच्या सोबत कधी प्रत्यक्षात भेट झाली नाही. पण सोशल मिडिया च्या माध्यमातून ते सतत संपर्कात असतात. सदर लेख हा त्यांचा समाज ऊपयोगी कार्याचा प्रित्यर्थ लिहलेला आहे.

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो - भाग 3, ऋषिकेश बालगुडे आणि त्यांची अवेंर्जस टिम

पुण्याचे सुपरहिरो - भाग 3

'मदत नव्हे तर कर्तव्य' चे जनक

अवेंजर्स .... आतापर्यंतचा  सगळ्यात यशस्वी चित्रपट. सुपरहिरो ची टिमच थॅनोस राक्षसाचा नाश करते. ज्या पुणे शहरात करोना रुपी थॅनोस राक्षस अवतरला त्या वेळी एक सुपरहिरोची अवेंजर्स टिम या राक्षसापासुन आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत करीत होती. आणि या सुपरहिरो टिमचे कॅप्टन होते "ऋषिकेश ऊर्फ आबा बालगुडे."

मौत को देखा पैरों🦶🏻 की धुल की तरह, 
तकदीर को ठुकराने वाले सुल्तान 💪🏻की तरह, 
चिंगारी🔥 पैर से दबाके धरधर खंजर🗡️ पे चलके, दिल❤️ में जो डर ऊठा ऊसे हमेशा के लिए मारके,
जिगरवालों योध्दा की फौज⚔️🛡️ बनाकर दुष्मन पे छा गया. 
काल का विनाश करने महाकाल आहे गया....... 🤩

हे वाक्य ज्या व्यक्तीला तंतोतंत लागू पडते ते अष्टपैलू जनसेवकाचे उत्तम उदाहरण म्हणजे ऋषिकेश  पांडुरंग बालगुडे.

समाजातील सगळ्याच घटकातील आणि सर्वच क्षेत्रातील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम ऋषिकेश बालगुडे  आणि त्यांच्या अवेंजर टिमने यशस्वीरीत्या राबवून दाखवले. 'मदत नव्हे तर कर्तव्य" या भावनेमधुन केलेले काम हे प्रत्येक पुणेकरांसाठी एक आदर्शच म्हणावा लागेल. 

करोना च्या काळात ज्या वेळी भले भले महारथी घरात बसले होते त्या वेळी या अवेंजर्स टिमने गरजू लोकांना घरोघरी जाऊन अन्नधान्य, दुध,घरातील दररोज च्या वापरातील वस्तूंचे  वाटप केले.यामध्ये कुठलाही भेदभाव न करता गरजु रिक्षाचालक, वाहनचालक, कलाकार ,पडद्यामागचे कलाकार,हातावर पोट असणारे मजुर अशा सर्वांना मदत करण्यात आली. लाॅकडाऊन च्या पहिल्या दिवसापासून जवळपास ६००-७०० गरजु लोकांना तसेच पुणे शहरातील Mpsc/Upsc करणा-या विद्यार्थी मित्रांची सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली...... पोलीस आणि ईतर कर्मचारी बांधव यांना त्यांच्या स्वरक्षणासाठी हजारो फेसशिल्डचे आणि मास्कचे वाटप तसेच मार्च ते मे महिन्यात दररोज 400-500 पाणी बाॅटल्स आणि कोल्ड्रिंक्स वाटप करण्यात आले...... पुणे जिल्हा सत्र न्यायालय आणि पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात तसेच सरकारी कार्यालयात तापमान मोजण्यासाठी टेम्प्रेचर गन 🔫आणि आॅक्सिमिटर 🌡️चे वाटप करण्यात आले.  शहरात रक्ताचा तुटवडा पडला असताना रक्तदान शिबिराचे तसेच प्लाझ्मा डोनेशन चे आयोजन, पेट्रोल पंपावरील कर्मचारी वर्गाला तसेच ईतर कामगारांना मोठ्या प्रमाणात मास्क आणि फेसशिल्डमास्क वाटप, शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांना आणि कर्मचारी वर्गाला सॅनिटाइजर आणि सॅनिटाइजर स्टॅण्ड चे वाटप ऋषीकेश बालगुडे आणि मित्र परिवारातर्फे करण्यात आले. गणेशोत्सव काळात सरकारने दिलेल्या नियमानुसारच गणपती विसर्जनासाठी हौद ऊपलब्ध करून देण्यात आले, तसेच शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन , रहीवासी ईमारती आणि ईतर महत्त्वाचे ठिकाणी फवारणी करून जंतुसंसर्ग टाळण्यासाठी विशेष योजना  या योध्यांनी स्वतः काम करुन प्रत्यक्षात आणल्या. 

या महामारी च्या काळात सर्वात महत्त्वाची असलेली गोष्ट म्हणजे जनजागृती आणि मार्गदर्शन सुचना. करोनाग्रस्त रुग्णांना योग्य ते माहिती व मार्गदर्शन मिळण्यासाठी काॅलसेंटर ची उभारणी, तसेच हाॅस्पिटल मधुन डिस्चार्ज मिळाले नंतर घ्यावयाची काळजी या सुचनांचे नियोजन, करोनाग्रस्तांना लवकरात लवकर बेड आणि ट्रीटमेंट उपलब्ध होण्यासाठी  ऋषीकेश बालगुडे यांनी केलेली धडपड आणि प्रयत्न वाखण्याजोगी आहे. करोना जम्बो कोविड सेंटर मध्ये प्रशासन आणि नियोजकांकडुन झालेल्या चुका दाखवण्याचे आणि योग्य ते ऊपाय सुचवण्याचे काम करणे, तसेच लाॅकडाऊन च्या काळात जे नागरिक महाराष्ट्राबाहेर अडकले होते त्यांना परत सुखरूप पुण्यात आणण्यासाठी त्यांच्या सतत संपर्कात राहून आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देणारा योध्दा म्हणजे ऋषिकेश बालगुडे. गिरीश बालगुडे हे त्यांचे लहान बंधु.... ते सुद्धा या लढाईत तेवढ्यात ताकदीने या महामारी लढाईत उतरून थोरल्या भावाला साथ दिली..... अजय अतुल ची जोडी तर पुणेकरांनी पाहिली.... पण या सुपरहिरो भावांची जोडीचे हे कदाचित पहिलेच उदाहरण असेल. 

करोनाग्रस्त रुग्णांना बेड मिळवुन देण्यासाठी केलेली धडपड आणि त्यानंतर त्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मानलेले आभार हीच कामाची पावती माणुन हा करोनायोध्दा आजसुद्धा पुणेकरांना मार्गदर्शन आणि मदत करण्यास कुठे ही कमी पडत नाही. 'मदत नाही तर कर्तव्य' या ब्रिदवाक्याचा प्रात्यक्षिकच संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. 

आपल्या  स्वताच्या कुटुंबावर सुध्दा करोना ने हल्ला केला असताना हा योध्दा माणुसकीची लढाई तेवढ्याच ताकदीने आणि त्वेषाने लढत होता आणि आजही लढतोय.

खासदार श्रीरंग अप्पा बारणे, संजयदादा बालगुडे, पुनितदादा बालन, राहुलदादा कुल , बाळासाहेब दाभेकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन आणि कुटुंबातील भा गिरीश बालगुडे, विनित बालगुडे आणि अभिषेक बालगुडे भावांची आणि सदस्यांची खंबीर साथ तर होतीच पण  सोबत बाळासाहेब पिलावरे, शैलेश परदेशी,उमेश काशीद ,अमर देसाई, ऋषिकेश गायकवाड, युवराज देसाई, राकेश गुंजाळ, चैत्यन राऊत ,प्रणव नामेकार, सुरज गायकवाड, विकास गायकवाड , योगेश पारडे, मिलिंद रसाळ,हेरंब पिलावरे ,स्वप्निल पायगुडे, अनिकेत रूपनर, अभिजीत नलगे, आशिष परदेशी, अभिजित राऊत,  तुषार चौधरी, राहुल काळे, वैभव बालगुडे,  भगवान चौधरी, साई होले,श्री होले,आकाश पायगुडे, प्रतीक शेलार, दिव्येश कदम, गणेश पडळकर, समर्थ पिलावरे, अथर्व पाथरे,अथर्व शेडगे, प्रसाद होले, आणि खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आणि राजीव युवा फाऊंडेशन चे लहान थोर कार्यकर्ते ही एक भली मोठी अवेंर्जस टिम पण तहान भुक हरवुन न घाबरता मदत नव्हे तर कर्तव्य हे ध्येय ऊराशी बाळगुन काम करत होती, "आणि या सर्व अवेंर्जस च्या टिमला एकत्र आणणारा आर्यन मॅन  म्हणजे ऋषिकेश ऊर्फ आबा बालगुडे."


अशा या सुपरहिरो ला आणि त्यांच्या अवेंर्जस टिम आणि मार्गदर्शकांना आणि त्यांच्या कार्याला पुणेकरांच्या वतीने सलाम..... सलाम...... सलाम🙏🏻

भाग 3 - आठवण जल्लोषाची.... भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टि-20 विश्वचषकाची 2007 युवराज सिंग च्या 6 षटकाराची गोष्ट

भाग 3 - आठवण जल्लोषाची.... भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टि-20 विश्वचषकाची 2007 

दिनांक 19 सप्टेंबर 2007
डरबन साऊथ आफ्रिका

सुपर 8 च्या सुरुवातीला न्यूझीलंड संघाकडून पराभव झाल्यानंतर आजच्या दिवशीचा ईंग्लंड संघाविरुद्धचा सामना जिंकणे भारतीय संघाला अनिवार्य होते. हा सामना भारतीय संघाने जिंकला पण हा सामना युवराज सिंग च्या एका ओवरमधल्या 6 षटकारामूळे जास्त चर्चेत राहिला. आणि येथुनच युवराज ला सिक्सर्स किंग पदवी प्रेक्षकांनी अर्पण केली. 

टाॅस जिंकल्यावर भारतीय संघाने फलंदाजी चा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत सेहवाग आणि गंभीर ने अर्धशतके झळकवित  136 धावांची सलामीची भागिदारी रचली. दोघे बाद झाल्यानंतर 15 व्या षटकानंतर युवराज ची मैदानावर एंट्री झाली. 2-4 चेंडू खेळुन झाल्यानंतर ईंग्लंड च्या अॅण्ड्रु फ्लिंटाॅफ  ने युवराज ला शेरेबाजी केली. मग शांत बसेल तो युवराज कसला... युवराज आणि फ्लिंटाॅफ मध्ये जोरदार शाब्दिक चममक झाली. आणि इथेच फ्लिंटाॅफ कडून सर्वात मोठी चुक झाली . त्याच्या या शाब्दिक शेरेबाजी मुळे चिडलेल्या युवराज सिंग ने 19 व्या षटकात स्टुअर्ट ब्राॅड  ला सलग 6 षटकार ठोकले.  षटकार ईतके जबरदस्त होते की ईंग्लंड च्या सर्व खेळाडूंनी तोंडात बोटे घातली कर्णधारासकट. 6 वा षटकार मारले नंतर स्टेडियम मध्ये विश्वचषक जिंकल्यासारखा जल्लोष झाला. पुढच्या षटकात युवराज ने फ्लिंटाॅफ ला सुध्दा एका कडक षटकारांची महाप्रसाद दिला. 20 षटकांत भारतीय संघाने 218 धावांचा डोंगर उभा केला. 

या महाकाय आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न ईंग्लंडने केला पण त्यांचे प्रयत्न जिद्दी भारतीय संघाने पुर्ण होऊ दिले नाही. भारतीय संघ 18 धावाने सामना जिंकला . 

 एकाच षटकात 6 षटकार मारणा-या युवराज सिंग ला  सामना विराचा किताब देण्यात आला. आणि विश्वचषकाच्या दिशेने भारतीय संघाने अजुन एक दिमाखदार पाऊल टाकले

युवराज सिंग ने मारलेल्या 6 षटकार पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 
https://youtu.be/9wJAq_Dg5FA

माहिती संकलन आणि लेखन
अॅड. गिरीश भोसले

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो - भाग 2 अॅड. रुपालीताई पाटिल

पुण्याचे सुपरहिरो - भाग 2

एक छोटा अणु काय करू शकतो हे हिरोशिमा आणि नागासाकी वर पडलेल्या अणुबाँब ने दाखवून दिले. पण एक महिला चुकलेल्या व्यवस्थेला एका क्षणात कशा प्रकारे जागेवर आणु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे रुपालीताई पाटिल.... 

4-5  दिवसापूर्वी एक विडिओ क्लिप फेसबुक वर पाहण्यात आली. त्याची थोडी माहिती घेतली असता असे कळाले की, करोना च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. जम्बो सेंटरच्या प्रवेशद्वारावर बाऊन्सर नेमण्यात आले होते. पण अशा फक्त भव्य दिव्य दिसणारे या बाउंसरांना न जुमानता एक वाघिण सरळ आत शिरली.... जम्बो कोविड सेंटरच्या समन्वय समिती ची मिटिंग चालू असताना त्यांनी बाऊन्सर गेटवर असल्याचा जाब आणि कारण विचारले. आणि काही वेळातच समन्वय समितीला बाऊन्सर प्रवेशद्वार वरुन हटवावे लागले. याचे संपुर्ण श्रेय जाते ते केवळ रुपालीताई पाटिल यांना. 

जम्बो कोविड सेंटर हे सामान्य पुणेकरांसाठी आहे. तिथे येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना योग्य ती सेवा मिळालीच पाहिजे या हेतूने रुपालीताई यांनी जे पाऊल उचलले ते योग्यच आहे. सामान्य रुग्णांसाठी बांधलेल्या या कोविड सेंटर च्या गेटवरील बाऊंसर गेट ऊघडत नसल्यावर डायरेक्ट गेट वर चढुन आत घुसुन आयुक्तांना जाब विचारणारी तरुणी म्हणजे रुपालीताई पाटिल, ऋषिकेश बालगुडे आणि त्यांचे सहकारी.
पण व्यवस्थापनाच्या कारभाराविरोधात आंदोलन केले कारणास्तव रुपालीताई यांना अटक करण्यात आली. पण त्यांच्या वर केलेली स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने साफ फेटाळून लावली. पुणेकरांना दिलासा आणि मदत मिळवुन देणारे कार्य केल्यानंतर माझ्या वर कारवाई होणार असेल तर जनतेशी बांधिलकी जपण्यासाठी आम्ही काम करणारंच , जीव गेला तरी बेहत्तर अशी  रोखठोक भुमिका मांडणारी पुणे शहराची वाघीण रुपालीताई पाटिल आम्हां पुणेकरांना आपला सार्थ अभिमान आहे. 
झाशीची राणी ची भुमिका केल्याने कोणी राणी लक्ष्मीबाई होत नाही. आधुनिक जगातील राणी लक्ष्मीबाई तर ती आहे जी आपल्या समाजातील लोकांसाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकते.

विशेष सहकार्य
अक्षय वाडकर

लेखक
अॅड. गिरीश भोसले
रुपालीताई आणि मी दोघेही वकील क्षेत्रात असलो तरी आमचा दोघांचाही कुठलाही परीचय नाही. सदर लेख हा त्यांनी केलेल्या एक धडाकेबाज कामाच्या प्रित्यार्थ लिहलेला आहे.

आठवण जल्लोषाची.... भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टि-20 विश्वचषकाची 2007 & भाग 2

आठवण जल्लोषाची.... भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टि-20 विश्वचषकाची 2007 & भाग 2

कभी कभी जितने के लिए कुछ हारना भी पडता है..... 
और हारकर जितने वाले को बाजीगर कहते  है.
सूपर 8 मध्ये पाकिस्तान संघाला हरवून भारतीय संघाने दिमाखात प्रवेश केला होता पण न्युझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या मातब्बर संघासोबत भारतीय संघाला टक्कर द्यायची होती. 
दिनांक 16 सप्टेंबर. 
जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका येथे भारतीय संघाचा सुपर 8 फेरीतील पहिला सामना न्यूझीलँड विरुद्ध होता. भारतीय संघाने टाटा जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण चा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंड संघाने धुव्वाधार फलंदाजी करताना 190 धावा केल्या. 
भारतीय संघाची सुरवात एकदम धुव्वाधार फलंदाजीने झाली. विरेंद्र सेहवाग च्या 40 धावा आणि गौतम गंभीरच्या अर्धशतकामुळे भारतीय संघ सुरवातीला सुस्थितीत होता. पहिली विकेट 6 व्या ओवरला 76 धावांवर पडल्या नंतर भारतीय संघाचा ठराविक अंतरावर विकेट पडल्या. भारतीय संघाचे 4 फलंदाज तर दोन आकडी धावांचा संख्या सुध्दा गाठू शकले नाही. आणि भारतीय संघाचा केवळ 10 धावांनी पराभव झाला. डॅनियल विटोरी ने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन करुन 4 विकेट घेतल्या. 

पण काही वाघ जर दोन पावले मागे सरकतो तो पळुन जाण्यासाठी नव्हे तर झडप घालण्यासाठी हे वाक्य भारतीय संघाने खरे करून दाखवले. 
एखाद्या संघाला पराभव झाल्यानंतर त्याने घेतलेल्या गरुड झेपेचे अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे भारतीय संघाचा  या विश्वचषकामधील प्रवास. 

या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला असला तरी , 
कभी कभी जितने के लिए कुछ हारना भी पडता है..... 
और हारकर जितने वाले को बाजीगर कहते  है.
हे वाक्य तंतोतंत खरं करून दाखवून विजेतेपदाला गवसणी घातली.

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो- भाग 1......सचिन भारती शिवाजीराव जामगे

पुण्याचे सुपरहिरो- भाग 1

सुपरहिरो म्हणलं की बाॅलीवुड, हाॅलिवुड मधले दृश्य आठवतात. पण ज्या वेळी जगावर महामारीचं संकट आलं त्या वेळी काही जणांनी सुपरहिरो ना लाजवेल असं कार्य केल त्यांचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पण त्यांचे कार्य पाहुन त्यांना पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा देण्याचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न.

साधारणपणे 22 मार्च पासुन लाॅकडाऊन ला सुरवात झाल्यापासून ते आजतागायत पुणे शहरातील एक  तुमच्या आमच्या सारखाच एक युवा तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या संघटनेच्या आणि मित्रांच्या मदतीने पुणे शहरातील गोर गरीब आणि गरजवंत नागरीकांना प्रेमाने 2 घास भरविण्याचे आणि फुडपॅकेट्स पोहचविण्याचे काम न थकता,  न थांबता, पावसाची तमा न बाळगता अविरतपणे करीत आहे. 

"नाव सचिन भारती शिवाजीराव जामगे."

आपल्या संपुर्ण नावातच क्रिकेटच्या देवाचा,आपल्या भारत देशाचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अंश लपलेला असलेल्या या सुपरहिरोने आपल्या नावाला शोभेल अशी कामगिरी करून एक उत्तम आदर्शच आपल्या समोर उभा केलेला आहे.

अत्यंत सामान्य घरातला तरुण..... पण  भल्या भल्यांना तोंडात बोट घालायला लावेल एवढी मदत या तरुणाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणेकरांना केली आहे. साधारणपणे 6 लाखा पेक्षा जास्त फुड पॅकेट्सचं वाटप आणि 15 हजार पेक्षा जास्त किराणा सामानाच्या किट चे वाटप आतापर्यंत आपल्या आणि आपल्या सहकार्यांच्या मार्फत करण्यात आले. ज्या वेळी एखाद्या सामान्य कुटुंबावर भुक कशी भागवायची हा प्रश्न उभा राहिला त्या वेळी एक पुणे शहरात एक सुपरहिरो अवतरला आणि त्याने अविरतपणे पुणेकरांची सेवा केली तो सुपरहिरो म्हणजे "सचिन आण्णा जामगे".

कुठल्याही पक्षाचा अथवा राजकीय नेते मंडळींचा कार्यकर्ता नसलेल्या या सुपरहिरोने गणेशोत्सव काळात एक नवीन संकल्पना आपल्यासमोर आणली. अरसेनिक अल्बम 30 च्या हजारो गोळ्या आणि हजारो मास्क चा नैवैद्य गणपती बाप्पा मंडळ आणि ट्रस्टला अर्पण करून तो पुणे शहरातील नागरिकांना वाटण्यात आले. एक अफाट कल्पनाशक्ती चे साक्षात कृतीत रुपांतर करण्याचे एक मुर्ती मंत उदाहरण च म्हणावे लागेल. 

 आपले कार्य एका ब्लॉग अथवा एखाद्या लेखात पुर्ण होईल असे नक्कीच नाही. पण आपण आणि आपले सहकारी बांधव तसेच वंदे मातरम संघटना,युवा फिनिक्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने केलेल्या एका भुतो न भविष्यातो कार्याला समस्त पुणेकरांच्या वतीने सलाम...... सलाम...... सलाम

टिपण्णी - सचिन जामगे यांचे कार्य पाहण्यासाठी एकदा नक्कीच "सचिन भारती शिवाजीराव जामगे" यांच्या फेसबुक प्रोफाईला अवश्य भेट द्या. 

धन्यवाद. 

विशेष सहकार्य 
अक्षय वाडकर

लेखक
गिरीश भोसले

सचिन आण्णा जामगे आणि माझा परीचय नसुन केवळ त्यांनी या महामारी च्या केलेल्या अभुतपूर्व कार्याचा गौरव म्हणून सदर लेख लिहिला आहे. 
 योगायोग म्हणजे आम्ही दोघे स. प. महाविद्यालयाचे विद्यार्थी... आजपण स.प.महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नियमित साफसफाई करून आरती करणारे सचिन आण्णा जामगे आठवतात.

भाग 1 - आठवण जल्लोषाची.... भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टि-20 विश्वचषकाची 2007

 

बरोबर आजच्या दिवशी 13 वर्षापूर्वी भारत आणि पाकिस्तान मधील क्रिकेट प्रेमींचे श्वास रोखले होते. 
कारण पण तसंच होतं. 
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांचा टि 20 विश्वचषकातील एकमेकांविरोधात खेळला गेलेला पहिला बाॅल आऊट वाला थरारक सामना. 

दिनांक 14 सप्टेंबर 2007
स्थळ - डरबन,  दक्षिण आफ्रिका, सामना क्र. 10   प्रथम टि 20 विश्वचषक 2007

2007 च्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच फेरीतील मानहारक पराभवानंतर  सचिन , द्रविड आणि गांगुली या त्रिकुटाच्या माघारी नंतर नवख्या महेंद्र सिंग धोनी च्या नेतृत्वाखाली अत्यंत नवखा आणि युवा खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. 


पहिला स्कॉटलंड विरुद्ध चा सामना पावसामुळे रद्द झाला आणि पुढच्या फेरीत जाण्यासाठी भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध चा सामना जिंकणे अनिवार्य होते. 
शोएब मलिक ने टाॅस जिंकून भारतीय संघाला फलंदाजी साठी आमंत्रित केले. पहिल्या ओवरमध्ये गंभीर, तिसऱ्या ओवरला सेहवाग, पाचव्या ओवरला युवराज आणि सातव्या ओवरला कार्तिक ने पॅव्हिलियन चा रस्ता धरला.   पण त्यांनंतर राॅबिन ऊथ्थपाच्या अर्धशतकांसह आणि धोनी च्या 33 आणि इरफान च्या झटपट 20 धावांमुळे भारतीय संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 141 धावा केल्या. 

अत्यंत साधे वाटणारे लक्ष्य सहज पार करू या हेतूने पाकिस्तान चा संघ फलंदाजी ला आला. पण झालं ऊलटंच ठराविक अंतरावर विकेट पडत गेल्या. पण मिसबाह ऊल हकने एका बाजूने किल्ला लढवून ठेवला होता. अवघड वाटणारे लक्ष्य त्यांने एकदम सोपे करुन टाकले. शेवटच्या दोन चेंडूवर केवळ एका धावेची गरज असताना सुध्दा पाकिस्तान संघाला रोखण्यात भारतीय संघाला यश आले आणि सामना टाय झाला. 
पण खरी गम्मत पुढे होती. टि 20 साठी नवीन नियम होते. बाॅल आऊटच्या नियमानुसार सामन्याचा निकाल लागणार होता. 
भारतीय संघाने प्रथम विरेंद्र सेहवाग ला बोलविले. सेहवाग ने कोणतीही चुक न करता त्रिफळा उडविला. त्यानंतर पाकिस्तान च्या यासिर अराफात चा चेंडू स्टंप ला न धडकताच वाया गेला. त्यानंतर हरभजनने सुध्दा त्रिफळा उडविला आणि पाकिस्तानच्या इतर गुल चा चेंडू यष्ट्यांपासुन फुटभर लांबुन गेला. सर्वांना आश्चर्यकारक वाटणारा निर्णय महेंद्र सिंग धोनी ने या वेळी घेतला. फलंदाज राॅबिन ऊथ्थपाला गोलंदाजी साठी पाचारण केले. सर्वांना आश्चर्य वाटले पण ऊथ्थपाने कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत त्रिफळा उडविला आणि सगळ्या प्रेक्षकांना टोपी काढुन अभिवादन केले. आता सामन्याचा निकाल फक्त एक चेंडूनंतर ठरणार होता. अनुभवी शाहिद आफ्रिदी चा चेंडू तर  वाईड टाकल्यासारखा लांबुन गेला. आणि भारतीय संघाला ना भुतो ना भविष्यातो असा थरारक ऐतिहासिक विजय मिळाला. 

आणि येथुनच धोनी पर्वाला सुरवात झाली.

या सामन्याचे हायलाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://youtu.be/FPyLUqVDNLU

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

खाकी वर्दीतला बाप्पा........ ❤

आदरणीय महाराष्ट्र 
आणि मुंबई पोलीस बांधव
रा. प्रत्येक भारतीयांच्या
मनामनात ❤

स. न. वि. वि. 
पत्र लिहण्यास कारण की, 

कालच गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. पण बाप्पाला निरोप देताना जेव्हा डोळे मिटले तेव्हा बाप्पांनी एक गोष्ट सांगितली..... अरे मी जाईन... पुढच्या वर्षी परत येईल. पण माझं प्रतिबिंब तुमच्या जवळ तुमची सेवा, काळजी, जबाबदारी आणि तुमचे संरक्षण नेहमीच करत आले आहे आणि यापुढे ही करत राहिल. 
ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस...... 

करोना च्या सुरुवातीच्या काळात रशियात काही तरी 600 सिंह रस्त्यावर सोडले अशी अफवा आली होती.....शेवटी परदेश म्हणल्यावर अफवा च ती....
पण..... 
आमच्या महाराष्ट्रामधील  सगळे निधड्या छातीचे सिंह आमचे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस करोना च्या महामारीसोबत लढुन नागरिकांचे संरक्षण करीत होते. फक्त संरक्षण नव्हे ज्या लोकांना अन्न मिळत नव्हते त्या गरजूंना सुध्दा घासातला घास आमच्या  पोलिस बांधवांनी दिला...
ज्या वेळी भले भले स्वताला रथी महारथी म्हणवणारे, महामारीमुळे भीतीने घरात लपुन बसले होते त्या वेळी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस पोलिस आणि आपले डाॅक्टर , हाॅस्पिटल आणि सफाई कर्मचारी आणि जनसेवक करोना च्या महामारीशी निर्धाराने लढत होते. पण पहिल्या फळीतला महायोध्दा म्हणजे आमचे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस.
ज्या ज्या वेळी मनुष्यप्राण्यावर संकट धावुन येते. त्या वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता धावून जाणारी व्यक्ती म्हणजे  पोलिस बांधव. 26/11 चा हल्ला याचे उदाहरण म्हणता येईल. 

  करोनाच्या लढाईत आपल्या कार्याला आणि शौर्यालाकडे पाहुन बाहुबली मधला एक संवाद नक्कीच आठवतो.

उस मृत्यु को मारने जा रहा हूँ मैं
मेरी माँ और मातृभूमि को कोई नीच पापी छु नहीं
सकता....
उनकी छाती चीरकर उन सबको ये कहने जा रहा हूँ मैं....
मेरे साथ आएगा कौन ?

अशा आमच्या मनुष्यरुपी सिंघम बाप्पा चा आम्हाला फक्त गर्व नाही तर  मनापासून अभिमान आहे. 

सर्व महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस बांधवांना समर्पित

कळावे. 


प्रेषक
आपला अभिमान असणारा 
एक भारतीय नागरिक

धन्यवाद


संकल्पना आणि लेखन
अॅड गिरीश  उज्वला मधुकरराव भोसले
मांजरी बुद्रुक, 9518553911

कार्यकर्ता....... ❤

प्रिय 
गणेश मंडळ कार्यकर्ते
बांधव, 
रा. घराघरात..... मनामनात

तुमच्या सारखा मी पण  एकेकाळचा, एक वयस्कर पण मनाने तरुण असलेला पुण्यातील मंडळाचा एकवेळेचा कार्यकर्ता. 

करोना सारखे महाभयंकर संकट जगावर असताना आपण महाराष्ट्रातील (खास करुन पुणे आणि मुंबई येथील) गणपती मंडळाच्या कार्यकर्ते बांधवांनी सरकारने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करुन समाजासमोर जो आदर्श ठेवला आहे. तो वाखाण्याजोगा आहे. तूमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.  शारीरिक अंतर राखत आणि मंडळाच्या सहाय्याने सामाजिक कार्य करत करोना रोगाशी लढण्यासाठी तुम्ही जी सामान्यी नागरिकांना मदत करत आहात त्या कार्यातच आणि त्या सेवेतच गणपती बाप्पा विराजमान आहे.

आपल्या भावनांवर आवर घालून केवळ समाजाप्रती असलेल्या काळजीपोटी आपण जो साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला आहे त्यातच दिसुन येत आहे की आपला विघ्नहर्ता आपल्या लेकरांना या त्रासातून लवकरच मुक्त करेल. 

मला या आधी वाटतं होतं की गणपती बाप्पा फक्त दहा दिवस आपल्या घरी आणि मांडवात असतो पण..... तुमच्या सारख्या जनसेवा करणारे मित्रांना पाहिल्यावर बाप्पा तुमच्या मध्ये च मानवाच्या रुपात असतो याची खात्री झाली. 

आपल्या भावनांना, भक्तीला आणि आपल्या जनसेवेला मानाचा मुजरा...... 

सर्व कार्यकर्ता बांधवाना सदर पत्र अर्पण

धन्यवाद. 


कळावे, 


प्रेषक
आपल्या वर 
प्रेम करणारा
ज्येष्ठ नागरिक 


टिप्पणी- सदर लेख एक ज्येष्ठ नागरिक   काकांच्या नजरेतुन लिहला आहे. जो सदैव कार्यकर्ता बांधवांचा चाहता आहे. 


 संकल्पना आणि लेखक
अॅड. गिरीश भोसले

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

निरोप घेतो आता तुझाआम्हा आज्ञा असावी चुकले काही आमुचे "आम्हा क्षमा असावी"

बाप्पा..... 

प्रति, 
गणपती बाप्पा, 
पत्ता- मातीच्या एका
कणापासुन ते आकाशातील
पावसाच्या एका थेंबा
पर्यंत सर्वव्यापी..... 
 

नको ना जाऊ तु बाप्पा.... 10 दिवस गणपती चा मंडप च आमच्यासाठी घर झाले होते. आणि आज विसर्जनानंतर सगळा मांडव सुना सुना होईल. करोना महामारी च संकट असलं तरी आम्ही तुझ्या मांडवात निर्धास्त होतो. कारण आमचा विघ्नहर्ता सोबत असताना आम्हाला कशाची ही भिती नव्हती.

आजपासून घर आणि मांडव सुना सुना होणार..... लहान लेकराचे रडणे पाहुन मन पण भरून येतय. ....या वर्षी करोना च्या महामारीमुळे ऊत्सवावर जरी निर्बंध आले असले तरी आमचा कार्यकर्त्यांचा ऊत्साह तसभुरही कमी झाला नाही.

तु जरी गावला जात असला.... तरी तुच पृथ्वीच्या कणाकणात आहे...... 
आमच्या मनात तु आहे.... 
आमच्या ध्यानात तु आहे.... 
विचारात तु आहे..... 
आचरणात तु आहे.....
पोलिस , डाॅक्टर, हाॅस्पिटल कर्मचारी, सफाई कामगार आणि करोना योध्दा बांधवाच्या रुपात तु तुझा अंश मनुष्य रुपात देऊन जात आहे. पण पुढच्या वर्षी तु जेव्हा येशील त्या वेळी आतापर्यंत न झालेला असा भव्य दिव्य, डोळे दिपवणारा महाऊत्सव आम्ही साजरा करू. 

निरोप घेतो आता तुझा
आम्हा आज्ञा असावी 
चुकले काही आमुचे 
"आम्हा क्षमा असावी"
गणपती बाप्पा मोरया 
पुढच्या वर्षी लवकर या

कळावे. 

प्रेषक
तुझाच लाडका भक्त


संकल्पना आणि लेखन
गिरीश भोसले

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...