मंगळवार, २८ मे, २०२४

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...




छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच असे प्रकार घडल्यावर आपण पुणेकर असल्याची लाज वाटती आहे सध्या. कारण देशात नाव बदनाम होतय ते माझ्या पुणे शहराचं.... 

माझ्या स्वप्नातील पुणे शहराबाबत पण माझं एक प्रामाणिक मत आहे

सगळ्यांना पिण्यासाठी आवश्यक प्रथम पाणी मिळायला पाहिजे.... बसमध्ये धक्के नको तर जागा मिळायला पाहिजे. मेट्रो च तिकीट स्वस्त व्हायला पाहिजे. एखादा व्यक्ती आजारी पडल्यावर त्याला ससुण रुग्णालयात खाजगी रुग्णालयासारखी चांगली व्यवस्था मिळाली पाहिजे.  ससुण मध्ये खरे रिपोर्ट मिळाले पाहिजे. पब चा एवजी मोफत शिक्षण संस्था उघडल्या पाहिजे. गडकिल्यांच संवर्धन व्हायला पाहिजे. आयटी हब पेक्षा झाडांचं शहर म्हणून घ्यायला मला नक्की आवडेल. होर्डिंग्ज आणि फ्लेक्स संकल्पना बंद केली पाहिजे. दिवाळी पहाट ला सारसबागेतले अपप्रकार थांबले पाहिजेत. कर्णकर्कश्श साउंड आणि लेझर लाईटवर निर्बंध असले पाहिजे. रेल्वे स्थानकावरच वायफाय फुकट नसलं तरी चालेल पण मुतारी साठी ५-५ रु. आकारणे बंद केले पाहिजे. सरकारी शिपाई पासून आयुक्त पर्यंत  सर्व सरकारी कर्मचारी भष्टाचारी नसले पाहिजे. शिवाजीनगर न्यायालयात पार्किंग ची सोय मोठी पाहिजे. मेट्रो ची कामांमुळे त्रास व्हायला नको. कोयता गॅंग संपुष्टात आली पाहिजे. भिकारीमुक्त शहर पाहिजे.
झोपडपट्टी नसली पाहिजे. कॅनोल फुटला नाही पाहिजे. होर्डिंग्ज पडुन अपघात व्हायला नाही पाहिजे. जोशी अभ्यंकर खुनाचा ईतिहास मिटला पाहिजे. नगरसेवक आमदार खासदार जण माणसातले पाहिजे. खाजगी शाळांचा फिया आटोक्यात आली पाहिजे. कचरा प्रश्न सुटला पाहिजे. रिंग रोड  आणि ईंटरनेशनल विमानतळ पाहिजे. भव्य दिव्य ऐतिहासिक नाना वाडा झाला पाहिजे. मुळा मुठाला  'नदीचं' रुप आलं पाहिजे. बस ची संख्या वाढली पाहिजे.
सिग्नल पाळणारे पुणेकर असावेत 
बास एवढीच अपेक्षा आहे पुणे शहर कसं असावं याची..... कारण सिग्नल वरुन देश ओळखला जातो.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...