ए तायडे.....
आईचं दुसरं रुप.... लहानपणापासूनची सोबती..... तरुण झाल्यावरची पहीली मैत्रीण.....हक्कानी भांडणारी..... आणि घरच्यांचा काळजाचा तुकडा... जेव्हा लग्न होऊन माहेरहुन सासरी जायला निघतो....
एका डोळ्यात आनंदाचे अश्रु आहेत....... आणि एका डोळ्यात विरहाचे दुख..... एका झटक्यात सगळं लहानपणापासून ते लग्न होण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आणि प्रसंग आठवतात....
आई वडीलांचे संस्कार.... शिक्षणासाठीचे घेतलेले तुझे कष्ट.... पहीली पासुन ते दहावी पर्यंत असलेला पहीला नंबर.... तु जेव्हा दरवर्षी स्टेजवर जेव्हा प्रथम क्रमांकाच बक्षीस घ्यायला जायची त्यावेळी उभ्या राहून अभिमानाने टाळ्या वाजविण्यात वेगळाच आनंद होता....
तुझ्याशी भांडल्यावर मी कितीही अबोला धरला तरी तुच पहीली बोलायची.....
मुलींनी शिकल्यावर त्या किती ऊंच यशाच्या शिखरावर जाऊ शकतात याचं आपल्या कुटुंबातील पहीलं उदाहरण म्हणजे तु........ आज आपल्या आईवडिलांच्या, ज्येष्ठांच्या आशिर्वादाने आणि शिक्षणाच्या पुण्याईने संसाराची सुरवात करीत आहेस...
फक्त तुझा एक येडा भावाला... तुझ्या शिवाय रहायची सवय नाहीये.........
तु फक्त खुश रहा...... घरच्यांना सगळ्यांना खुश ठेव....
आजच्या दिवसाची खुप वाट पहात होतो.... आज तो क्षण आलाय.. आज तु कु. गौरीची ची सौ. गौरी होत आहे.... अजुन काय आनंद हवाय एका भावाला.....
फक्त एक सांगतो तु ज्या वेळी तु त्याला बाळा बोलती ना.,... त्याला सगळं जग मिळाल्यासारखं वाटतं.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा